५ नोव्हेंबर १८१७ - खडकीची लढाई !
५ नोव्हेंबर १८१७ - खडकीची लढाई ! छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या मराठा साम्राज्याच्या अंताची सुरुवात ज्या लढाईत झाली ती लढाई म्हणजे खडकीची लढाई होय . दि . ५ नोव्हेंबर २०१८ रोजी या लढाईला २०१ वर्षे पूर्ण होतील . ही लढाई पुण्याजवळ खडकी येथे पेशवे बाजीराव रघुनाथ भट आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यामध्ये झाली . वस्तूतः १७६१ साली पानिपतावर जसे तुमुल युद्ध होऊन जशी दोन्ही पक्षांची प्रचंड प्राणहानी झाली त्या मानाने या खडकीच्या लढाईत झालेली प्राणहानी अतिशय नगण्य म्हणावी लागेल . पण तिकडे पानिपतावर झालेल्या प्रचंड हानी नंतर सुद्धा मराठा साम्राज्य नेटाने उभे राहते आणि इकडे मात्र खडकी ( आणि मग येरवडा , कोरेगाव भीमा आणि शेवटी आष्टी येथे ) मराठ्यांचा निर्णायक लष्करी पराभव न होताच मराठे शाही कशी बुडते हे वरकरणी समजून घेण्यास अवघड वाटते . यासाठी आपल्याला १८१७च्या आधी काही दशके मागे इतिहासात डोकवावे लागेल . मराठे इंग्रज संबंध :-